Nana Patekar : ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा - नाना पाटेकर

नागपूर : शेतकरी आत्महत्या हे आजचे सर्वात मोठे विदारक चित्र आहे. ते बदलणे आवश्यक आहे. राज्यात सरकार कुणाचेही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करणे थांबवेल त्या दिवशी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समजावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. काटोल येथील अरविंद सहकारी बँकेच्या आवारात दिवंगत अरविंदबाबू देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण नाना पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला काटोल नरखेड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला १५ हजाराचे धनादेश नाना पाटेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी नाना पाटेकर भावुक झाले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला धनादेश देण्याची वेळच येता कामा नये. याकरिता राजकारण बाजूला ठेऊन हा विषय हाताळावा लागेल. अनेकदा कानी पडते की, महाराष्ट्र देशात अव्वल आहे. माझ्या मते जेव्हा शेतकरी बळकट होईल तेव्हा आणि तेव्हाच महाराष्ट्र राज्यात पहिला होईल.

Comments
Add Comment

नवले पुलावरील अपघातानंतर ‘लूटमारी’चा व्हिडिओ व्हायरल ; नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन

विदर्भाची बाजी! राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘या’ विद्यापीठाला अव्वल क्रमांक; पुणे शेवटच्या स्थानी

नागपूर : विदर्भाने पुन्हा एकदा राज्यात आपली ताकद दाखवत गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्रातील १३ सार्वजनिक

दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या जुबेरच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी संशयास्पद डेटा! पुणे एटीएसचा तपास सुरू

पुणे: अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून पुण्याच्या एटीएसने जुबेर हंगरगेकर

व्हिडीओची सत्यता तपासण्याचे वन विभागाचे आवाहन

सोशल मीडियावरील एआय बिबट्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे भीतीचे वातावरण जुन्नर  : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक