Gram Panchayat Elections : ३१ पैकी अद्याप एकही अर्ज नाही दाखल

Share

रत्नागिरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणावरील वर्चस्व अधोरेखित करणाऱ्या या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धांदल सुरू आहे. मात्र, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. सद्यस्थितीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये उमेदवार गुंतले आहेत, त्यामुळे शेवटचे तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासह २४९ ग्रामपंचायत सदस्यांसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. निवडणुका होत असलेल्या ३१ ग्रामपंचायतींमध्ये नाटे, साखरीनाटे, पाचल या अकरा सदस्यीय, तर मिठगवाणे, नाणार, तळवडे, साखर, कळसवली, कोतापूर, ओझर, जुवाठी, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली या नऊ सदस्यीय, तर उर्वरित अठरा ग्रामपंचायती सात सदस्यीय आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, २ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र, ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.

नव्या वर्षामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वर्चस्व ताकद दाखवित प्रस्थापित करण्याची संधी गावपुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासह उमेदवारी निवडीमध्ये राजकीय पक्ष नेतृत्वासह गावपुढारी गुंतल्याचे चित्र गावागावांमध्ये दिसत आहे.

राजापुरातील ‘या’ ग्रामपंचायतींसाठी होणार आहे निवडणुका

मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, तळवडे, नाटे, साखर, वडवली, वाटुळ, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, प्रिंदावण, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातिवले, आजिवली, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, पाचल, खरवते, माडबन, विल्ये, हसोळतर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली़ एकूण ग्रामपंचायती : ३१; एकूण प्रभाग : ९६; एकूण सदस्य संख्या : २४९.

Recent Posts

‘पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार’

मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…

6 minutes ago

पॉवरफुल कलाकारांची लवकरच ‘आतली बातमी फुटणार’

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…

15 minutes ago

Jammu Kashmir Tourism : पर्यटकांनो ‘इथे’ फिरण्याचे नियोजन असेल तर आजच रद्द करा!

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…

31 minutes ago

पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारा पाकिस्तानच्या लष्करात होता SSG कमांडो

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…

38 minutes ago

Blouse Bow-Note Designs : ब्लाऊजसाठी ‘या’ बॅक बो-नॉट डिझाइन्स नक्की ट्राय करा!

महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…

38 minutes ago

Bandra Linking Road : वांद्रे येथील क्रोमा शो रूममध्ये अग्नितांडव

मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली.…

1 hour ago