water supply : मुंबईत काही भागांत पाणीपुरवठा बंद, तर काही भागांत कमी दाबाने

  199

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने मंगळवार २९ ते बुधवार ३० नोव्हेंबर या २४ तासांसाठी पाणीकपात (water supply) जाहीर केली आहे, यामुळे मुंबईतील साधारण विभागात पाणीपुरवठा बंद, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


मंगळवार सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणी कमी दाबाने आणि बंद असणार आहे.


महापालिकेकडून पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलिमीटर आगम वाहिनीवरील ३०० मिलिमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलिमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीच्या जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर बाय १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.


यादरम्यान २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत के/पूर्व, एच/पूर्व, एच/पश्चिम, पी/दक्षिण, एस, एल आणि एन या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे तसेच के/पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील.


के/पूर्व, जी/उत्तर, पी/दक्षिण विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, तर एच/पश्चिम विभागातील काही परिसरात २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल व काही परिसरात ३० नोव्हेंबर २०२२ पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


नागरिकांनी पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर