FIFA World Cup : ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात

दोहा (वृत्तसंस्था) : डी गटात ऑस्ट्रेलियाने ट्युनिशियावर १-० असा विजय मिळवत फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या (FIFA World Cup) मोहिमेची विजयी सुरुवात केली. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्युकने पहिल्याच हाफमध्ये २३व्या मिनिटाला गोल केला.


विशेष म्हणजे या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमध्ये तीन वेगवेगळ्या खंडातील संघांना पराभूत करणारी तिसरी टीम ठरली आहे. त्यांनी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांचा वेगवेगळ्या वर्ल्डकपमध्ये पराभव केला. यापूर्वी अशी कामगिरी इराण आणि अल्जेरियाने केली होती. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने १९७४ नंतर पहिल्यांदाच वर्ल्डकप सामन्यात गोल खाल्ला नाही. पहिल्या हाफमध्ये ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळाली.


दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ड्युकने २३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला आणि संघाचे गोलचे खाते उघडले. पहिल्याच हाफच्या सुरूवातीलाच ट्युनिशियाने गोल खाल्याने त्यांनी या गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार खेळ करण्यास सुरूवात केली. ट्युनिशियाने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर चढाई करण्यास सुरुवात केली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीने आपल्या गोलपोस्टचा चांगला बचाव केला.


यानंतर दुसऱ्या हाफमध्ये देखील ट्युनिशियाने पासिंग आणि बॉल पजेशनच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा सरस खेळ केला. याचबरोबर ट्युनिशियाने सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर १४ वेळा हल्ला चढवला. मात्र त्यातील ४ शॉट्सच अचूक होते. याउलट ऑस्ट्रेलियाने ९ शॉट्सपैकी २ शॉट्सच अचूक मारले. त्यातील एक गोलमध्ये रुपांतरित झाला. पहिल्याच हाफमध्ये गोल झाल्यानंतर ट्युनिशियाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ केला. पण त्यांना गोल काही करता आला नाही.

Comments
Add Comment

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९