Refinery Project : कोकणचा चेहरामोहरा बदलणाऱ्या रिफायनरीचे स्वागतच!

Share

रत्नागिरी : रिफायनरीसाठी कोयनेचे पाणी वापरायचा निर्णय स्वागतार्हच आहे. (Refinery Project) परंतु रिफायनरीची १.५५ टीएमसी गरज भागल्यावर उर्वरित पाणी किमान वाटेतील कोकणातील गावांना पिण्याकरिता व सिंचनाकरिता उपलब्ध करून दिल्यास कोकणातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरू शकतो, असे मत अॅड.विलास पाटणे यांनी व्यक्त केले आहे.

कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून लांबी ८०७ मीटर तर उंची १०३ मीटर आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी एवढी आहे. याबाबत २००५ साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या पेंडसे कमिटीने सकारात्मक अहवाल दिला होता. तसेच जलसंपदा विभागले २०१८ साली या प्रकल्पाचा अभ्यास करण्याकरीता निविदा काढली होती. परंतु सरतेशेवटी वर्कऑर्डर न काढल्याने गाडी पुढे सरकली नाही.

समुद्राचे पाणी निक्षरीकरण करण्याचा पर्याय खर्चिक तर आहेच शिवाय पर्यावरणावर परिणाम करणारा आहे. अर्जुना नदीचा पर्याय समोर आहे परंतु अर्जुनाचे पाणी प्रामुख्याने सिंचनाकरिता वापरायचे असा निर्णय होता. नाहीतर शेतकऱ्यांचे पाणी पळविले अशी ओरड सुरू होईल. सरतेशेवटी कोयनेचे वाशिष्ठी नदीत वाहून जाणारे पाणी रिफायनरीसाठी आणि कोकणच्या जनतेला पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरणे जास्त व्यवहार्य होईल. परंतु हे पाणी मुंबई किंवा तळकोकणात नेणे व्यवहार्य होणार नाही, असे मत अॅड.पाटणे यांनी व्यक्त केले आहे.

Insurance : गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल हे माहिती आहे का?

या पाण्यामुळे कोकणात आंब्याप्रमाणे तसेच इतरही विविध फळबागा विकसित करणे उचित होईल. मत्स्य संवर्धन यासाठी या पाण्याचा उपयोग करता येईल. पाणी ज्या प्रदेशातून वाहते तेथील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क ‘रिपरिअन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे. कोकणातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासन न्यायाची भूमिका घेईल यात शंका नाही. मात्र असे झाले नाहीतर ‘अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात नाकातोंडात पाणी आणि उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईने डोळ्यात पाणी’ हे कोकणातील दुष्टचक्र असेच सुरू राहिल. यासाठी शासनाने सकारात्मक दृष्टीने विचार करून कोकणचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले पाहिजेत.

Recent Posts

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

3 minutes ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

42 minutes ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

1 hour ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

7 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

8 hours ago