cyber crime : मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

कर्जत (वार्ताहर) : नोंदविण्याचे येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वीस टक्के सायबर गुन्ह्यांची (cyber crime) नोंद होत असते. मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर मुळे हे गुन्हे होत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम वापरामुळे आपण सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत जातो आणि बदनामी टाळण्यासाठी तरुण वर्ग आत्महत्या करण्यास मागेपुढे पहात नाही.


काही वर्षांपूर्वी लॉटरी लागली आहे, असा मेसेज यायचा त्यामुळे पैशाच्या लोभामुळे अनेकांना गंडा घातला गेला. एटीएम कार्ड मुळेसुद्धा फसवणूक होते. अशिक्षित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक याचे बळी ठरतात. ११२ हा नंबर तत्काळ पोलीस मदतीसाठी आहे. या नंबरवर कॉल केल्यास आपली अडचण थोडक्यात सांगितल्यास अर्ध्या तासाच्या आत पोलीस येतात. मात्र खोटी माहिती सांगू नका.' असा सल्ला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी येथे केले.


कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय, आयपीए- एमएसबी, आयपीए रायगड स्थानिक शाखा आणि कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६१ वा राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचे आयोजन सेमिनार हॉल मध्ये करण्यात आले होते. समारंभाचे उदघाटन कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी डॉ. काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाची माहिती सांगितली.


त्यानंतर डॉ. दीपक दळवी यांनी, सीपीआर आणि प्रथमोपचार प्रशिक्षण या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच प्रथमोपचार देण्याची तत्त्वे समजावून सांगितली. गरम वस्तू किंवा अग्नीमुळे होणाऱ्या बर्न्स हाताळण्याच्या तंत्राची चर्चा केली. त्यांनी पीडितेला वाचवण्यासाठी स्टॉप, ड्रॉप आणि रोल पद्धतींचा उल्लेख केला. विजेच्या धक्क्यांवर प्रथमोपचार करण्याबाबतही सविस्तर माहिती दिली.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग