water taxi : बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

अलिबाग (वार्ताहर) : बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी (water taxi) लाँचसेवा शनिवार २६ नोव्हेंबरपासून सुरु होत असल्याने अलिबागकरांना आता नवी मुंबईला केवळ सव्वा तासात पोहचता येणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.


नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. ही वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालविण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असून, ही सेवा बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. बेलापूर ते गेटवे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे सागरी मंडळाने बेलापूर ते मांडवा मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


शनिवार, २६ नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बेलापूर जेट्टी येथून सकाळी आठ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहोचेल. तर संध्याकाळी सहा वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहोचेल. सध्या नवी मुंबईतून अलिबागला पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर - मांडवा अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे. या सेवेसाठीच्या ऑनलाइन बुकिंगला बुधवारपासून सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग