Intellect Corrupt : बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?

  112

उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींवर कडाडून प्रहार


मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. कोश्यारी, त्रिवेदी यांच्या याच विधनानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले आहेत. “भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफीनामा लिहून दिला, असे विधान केले. त्यांची बुद्धी भ्रष्ट (Intellect Corrupt) झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी आपला संताप व्यक्त केला.


“आपण बारकाईने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेव्हाच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विचाराची कल्पना मांडलेली आहे. त्यांनी तेव्हाच आधुनिक भारताची संकल्पना मांडली होती. राजकीय क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंह अशा अनेक राष्ट्रपुरुषांचे स्फूर्तीस्थान शिवाजी महाराज होते. सामाजिक क्षेत्रात क्रांती करणारे शाहु महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांमुळेच प्रेरणा मिळालेली आहे. असे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवाजी महाराजांचे विचार जुने झाले, असे विधान केले आहे. त्यांनी हे विधान कशाचा आधारवर केले आहे,” असे म्हणत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.


“छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तीचा सन्मान केला. त्यांनी प्रत्येक धर्मातील धार्मिक स्थळांना आदराचे स्थान दिले. तरीदेखील असे वक्तव्य केले जात असेल तर चीड येते, राग येतो. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या जाती-धर्मतील लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला होता. या विचारांच्या आधारवच देश अखंड राहू शकतो,” असेही उदयनराजे म्हणाले.

Comments
Add Comment

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी