T-20 World Cup : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये!

लंडन (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा (T-20 World Cup) नवीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. आयसीसी आणि जगातील क्रिकेटच्या प्रशासकीय संस्थेने या स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. २०२४ मध्ये ही स्पर्धा होणार आहे.


आगामी विश्वचषकात २० संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत १६ संघ विश्वचषक खेळायचे. यापैकी ८ संघांनी थेट सुपर लीग फेरीत प्रवेश केला होता. उर्वरित ४ संघ पहिल्या फेरीतून पात्र ठरले होते. आता २० संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक गटात ५ संघ असतील. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. हे आठ संघ दोन सुपर लीग विभागात विभागले जातील. प्रत्येक विभागात चार संघ असतील. हे सर्व संघ आपापसात तीन साखळी सामने खेळतील. येथून प्रत्येक विभागातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत जातील आणि उपांत्य फेरीत विजयी होणारा संघ अंतिम फेरीत खेळेल.



Bronze medal : रायगड पोलीस दलातील दोघांना कांस्य पदक


आतापर्यंत १२ संघ या स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत. यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातील टॉप-८ चे संघ थेट पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला. याशिवाय आणखी दोन संघ क्रमवारीच्या आधारावर आले आहेत. उर्वरित ८ संघ क्वालिफायर स्पर्धेत उतरतील.

Comments
Add Comment

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि