Assam-Meghalaya : सीमेवर हिंसाचार, गोळीबारात वनरक्षकासह ६ जणांचा मृत्यू

गुवाहाटी : आसाम-मेघालय (Assam-Meghalaya) सीमेवर मंगळवारी सकाळी पहाटे हिंसाचार झाला. या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम पोलिसांकडून जंगलातील लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली जात असताना ही घटना घडली.


पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हा हिंसाचार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ४८ तासांसाठी सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी ही माहिती दिली.


इमदाद अली यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालय सीमेवर ट्रक थांबवला होता. ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी वनरक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ट्रकचा टायर पंक्चर झाला. यानंतर वनरक्षकांनी ट्रक चालकासह तिघांना पकडले. मात्र, इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर