Assam-Meghalaya : सीमेवर हिंसाचार, गोळीबारात वनरक्षकासह ६ जणांचा मृत्यू

  98

गुवाहाटी : आसाम-मेघालय (Assam-Meghalaya) सीमेवर मंगळवारी सकाळी पहाटे हिंसाचार झाला. या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम पोलिसांकडून जंगलातील लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली जात असताना ही घटना घडली.


पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हा हिंसाचार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून ४८ तासांसाठी सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी ही माहिती दिली.


इमदाद अली यांनी सांगितले की, आसाम वन विभागाने मेघालय सीमेवर ट्रक थांबवला होता. ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी वनरक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ट्रकचा टायर पंक्चर झाला. यानंतर वनरक्षकांनी ट्रक चालकासह तिघांना पकडले. मात्र, इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके