Air travel : छोट्या शहरांसाठीच्या विमानभाड्यांमध्ये होणार वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात छोट्या शहरांसाठी विमानभाड्यात वाढ होणार आहे. (Air travel) सरकारने प्रादेशिक फ्लाइट्सवरील ‘कनेक्टिव्हिटी’ शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


हे शुल्क प्रति फ्लाइट आकारण्यात येणार असून त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढेल. म्हणजेच, आगामी काळात प्रादेशिक उड्डाण सेवा वापरणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.


सरकार प्रादेशिक हवाई संपर्क शुल्क वाढवणार आहे. यामुळे प्रमुख मार्गांवर उड्डाण सेवा चालवणाऱ्या एअरलाइन्सकडून आकारले जाणारे प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी शुल्क प्रति फ्लाइट दहा हजार रुपये वाढवणार आहे. हा कर एक जानेवारीपासून लागू होणार असून, त्यानंतर विमान प्रवास महाग होणार आहे. एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. सध्या हे शुल्क प्रति फ्लाइट पाच हजार रुपये आहे. पुढील वर्षी एक एप्रिलपर्यंत ते १५ हजार रुपये होईल.


नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेसाठी डिसेंबर २०१६ पासून हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली. या वर्षी एक नोव्हेंबरपर्यंत, ४५१ उड्डाणमार्ग कार्यान्वित होते. येत्या काही वर्षांमध्ये असे आणखी मार्ग सुरू होण्याची अपेक्षा आहे.


विमान उद्योगातल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुल्क वाढ लागू झाल्यानंतर विमान प्रवासाचे दर प्रति व्यक्ती ५० रुपयांनी वाढतील. गेल्या महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेत केंद्र सरकारने शुल्क सुधारण्याचा निर्णय घेतला असून १ जानेवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत प्रति फ्लाइट दर दहा हजार रुपयांनी वाढणार आहे.


भारत सरकारची उडान म्हणजेच ‘देश का आम आदमी योजना’ ही दूरवरच्या भागात हवाई संपर्क स्थापित करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत विमानतळाची सुविधा असूनही नियमित उड्डाणे होत नसलेल्या शहरांना छोट्या विमानांच्या मदतीने मुख्य विमानतळाशी जोडण्यात आले आहे. सर्वप्रथम, या योजनेच्या मदतीने ईशान्येकडील भाग जोडले गेले. या भागात रस्त्याची सोय आहे; पण यात वेळ खूप लागतो. या योजनेंतर्गत प्रवाशांसोबतच दूरवरच्या भागात मालही पोहोचवला जातो.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'