Air travel : छोट्या शहरांसाठीच्या विमानभाड्यांमध्ये होणार वाढ

  78

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात छोट्या शहरांसाठी विमानभाड्यात वाढ होणार आहे. (Air travel) सरकारने प्रादेशिक फ्लाइट्सवरील ‘कनेक्टिव्हिटी’ शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


हे शुल्क प्रति फ्लाइट आकारण्यात येणार असून त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढेल. म्हणजेच, आगामी काळात प्रादेशिक उड्डाण सेवा वापरणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.


सरकार प्रादेशिक हवाई संपर्क शुल्क वाढवणार आहे. यामुळे प्रमुख मार्गांवर उड्डाण सेवा चालवणाऱ्या एअरलाइन्सकडून आकारले जाणारे प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी शुल्क प्रति फ्लाइट दहा हजार रुपये वाढवणार आहे. हा कर एक जानेवारीपासून लागू होणार असून, त्यानंतर विमान प्रवास महाग होणार आहे. एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. सध्या हे शुल्क प्रति फ्लाइट पाच हजार रुपये आहे. पुढील वर्षी एक एप्रिलपर्यंत ते १५ हजार रुपये होईल.


नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेसाठी डिसेंबर २०१६ पासून हे शुल्क आकारण्यास सुरुवात केली. या वर्षी एक नोव्हेंबरपर्यंत, ४५१ उड्डाणमार्ग कार्यान्वित होते. येत्या काही वर्षांमध्ये असे आणखी मार्ग सुरू होण्याची अपेक्षा आहे.


विमान उद्योगातल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुल्क वाढ लागू झाल्यानंतर विमान प्रवासाचे दर प्रति व्यक्ती ५० रुपयांनी वाढतील. गेल्या महिन्यात जारी केलेल्या अधिसूचनेत केंद्र सरकारने शुल्क सुधारण्याचा निर्णय घेतला असून १ जानेवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत प्रति फ्लाइट दर दहा हजार रुपयांनी वाढणार आहे.


भारत सरकारची उडान म्हणजेच ‘देश का आम आदमी योजना’ ही दूरवरच्या भागात हवाई संपर्क स्थापित करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत विमानतळाची सुविधा असूनही नियमित उड्डाणे होत नसलेल्या शहरांना छोट्या विमानांच्या मदतीने मुख्य विमानतळाशी जोडण्यात आले आहे. सर्वप्रथम, या योजनेच्या मदतीने ईशान्येकडील भाग जोडले गेले. या भागात रस्त्याची सोय आहे; पण यात वेळ खूप लागतो. या योजनेंतर्गत प्रवाशांसोबतच दूरवरच्या भागात मालही पोहोचवला जातो.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध