school : राज्यातील ३ विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

Share

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना वर्ष २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय (school) पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने नुकतेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’चे आयोजन केले होते. या प्रसंगी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्यासह केंद्रीय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांची निवड स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्लिक स्कूल या विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रातिनिधिक म्हणून त्या-त्या शाळेंचे विद्यार्थीही पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्राचार्यांसोबत उपस्थित होते.

या पुरस्कारातंर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-१९ च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष २०१६-१७ पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली. वर्ष २०२१-२२ च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण ३९ शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये ३४ विद्यालयांची निवड, तर उपश्रेणींमध्ये ५ विद्यालयांची निवड करण्यात आली. या अंतर्गत १७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. तसेच निवड झालेल्या विद्यालयांमध्ये २१ शाळा ग्रामीण भागातील, तर १८ शाळा या शहरी भागातील आहे. या विद्यालयांमध्ये २८ शाळा अनुदानीत, ११ शाळा खासगी, २ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, १ नवोदय विद्यालय आणि ३ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे.

Recent Posts

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद

ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…

29 seconds ago

घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…

13 minutes ago

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

29 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

54 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

57 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

2 hours ago