earthquake : इंडोनेशियात भूकंपाचा तीव्र हादरा; ४६ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक गंभीर जखमी

जकार्ता (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला सोमवारी भूकंपाचे (earthquake) हादरे बसले आहे. तब्बल ५.६ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या दुर्घटनेत ४६ नागरिकांचा मृत्यू आणि ७०० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.


राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किमी होता. यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला असून ७०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी दिली.


या भूकंपामध्ये सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. तर अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचेही नुकसान झाल्याचे समजते. तसेच इमारती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१

बांगलादेशात रक्तरंजित राजकीय संघर्ष

आणखी एका हसीनाविरोधी नेत्याला घरात घुसून घातल्या गोळ्या बांग्लादेश : बांगलादेशमध्ये शेख हसीना विरोधी आणखी एका

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने