जकार्ता (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला सोमवारी भूकंपाचे (earthquake) हादरे बसले आहे. तब्बल ५.६ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. या दुर्घटनेत ४६ नागरिकांचा मृत्यू आणि ७०० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किमी होता. यामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला असून ७०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी दिली.
या भूकंपामध्ये सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. तर अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचेही नुकसान झाल्याचे समजते. तसेच इमारती कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे.
कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने…
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…