बँकॉक (वृत्तसंस्था) : आशियाई कप टेबल टेनिस (Table Tennis) चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या मनिका बत्राने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
शनिवारी सकाळी चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील सामना हरल्यानंतर मनिकाने कांस्य पदकाच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि देशाला पदक मिळवून दिले. बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मनिकाने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेली आणि तीन वेळा आशियाई चषक विजेती हिना हयातचा ४-२ असा पराभव केला.
तत्पूर्वी, तिला उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित जपानी खेळाडू मीमा इटोकडून ८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११ (२-४) असा पराभव पत्करावा लागला होता. उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या सु-यूचा ४-३ असा पराभव केला होता.
भारतीय स्टारने एक दिवस आधी शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चेन सु-यूचा ४-३ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेत टॉप-४ मध्ये पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.
जागतिक क्रमवारीत ४४व्या क्रमांकावर असलेल्या मनिका बत्राने महिला एकेरीत अनेक उलटफेर केले. तिने सुरुवातीच्या फेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील चिनी खेळाडू चेन जिंगटोंगला बाहेरचा रस्ता दाखवला.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…