Air pollution : वायू प्रदूषणामुळे मानसिक विकारात वाढ

  129

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातल्या वायू प्रदूषणाची (Air pollution) पातळी वाढत आहे. त्यामुळे अनेक लोकांना श्वसनाचे आजार होत आहेत.


वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजारही होत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषणामुळे गेल्या महिनाभरात नैराश्य, चिंता आणि मानसिक तणाव यासारख्या मानसिक आजारांचे प्रमाण वाढल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.


अनेक अभ्यासांमधून दिसून आले आहे की, पीएम २.५ च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात आल्यामुळे ‘ब्लड ब्रेन बॅरिअर’चे नुकसान होत आहे. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ व मनस्थलीच्या संस्थापक डॉ. ज्योती कपूर यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून त्यांना चिंता आणि नैराश्याची अनेक प्रकरणे पहायला मिळाली आहेत. कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना हा त्रास झाल्याचे अधिक दिसून येत आहे. एखाद्या गोष्टीमुळे शारीरिक आजार असेल तर त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकेल. तसेच वायू प्रदूषणाचेही आहे. मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात. प्रदूषणाचा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो, असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. हा परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारचा असू शकतो.


श्वसनाच्या समस्या, झोप न लागणे आणि हवेतल्या धुक्यामुळे नीट न दिसणे यामुळे मेंदूत न्यूरोट्रान्समीटर सोडले जातात. प्रदूषणात असलेले काही कण आपल्या शरीरात जातात आणि नंतर श्वासावाटे रक्तात जातात. रक्ताभिसरण संपूर्ण शरीरात होते. त्यामुळे मज्जासंस्थेवरही परिणाम होतो. ‘एक्यूआय’ खराब असल्यामुळे चिंता, डिप्रेशन आणि काही प्रकरणांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो.


ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास कुमार सांगतात की, प्रदूषणामुळे मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांचे सर्वाधिक नुकसान होते. प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर, मुलांमध्ये न्यूरो-डेव्हलपमेंटसह कॉग्निटिव्ह फंक्शनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. गेल्या दोन आठवड्यांपासून काही अशा केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये लोकांना चिंता वाटणे तसेच झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यापैकी सुमारे ९५ टक्के लोक हे ऑफिसला जाणारे आहेत.

Comments
Add Comment

डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी वठणीवर आणणार! चीन दौऱ्याआधी दिल्लीत पुतिन-मोदी भेट होणार?

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा यावर्षी होणार असून, त्या दौऱ्याच्या तारखा सध्या अंतिम

पोस्टात मोठा बदल! १ सप्टेंबरपासून पोस्टाची 'ही' सेवा बंद होणार, नवीन नियमांचे फायदे-तोटे काय?

मुंबई : तुम्ही कधी विचार केलाय का, एका पत्रात किती भावना दडलेल्या असतात? एका क्षणाचा निरोप, आनंदाचे क्षण आणि

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया

Gurugram Crime : रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून! "कॅबची वाट पाहत असताना मॉडेलवर 'तो' घुटमळत होता… पुढे काय घडलं, वाचून हादराल!"

गुरुग्राम : गुरुग्राममधील राजीव चौक परिसरात अत्यंत वर्दळीच्या एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. एका मॉडेल

Devendra Fadanvis : "ओबीसीसाठी लढलो म्हणून टार्गेट झालो, पण लढा थांबणार नाही!" देवेंद्र फडणवीसांचा ठाम निर्धार

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Gujrat : गुजरातमध्ये सिंहाला छळणाऱ्या व्यक्तीला अटक; व्हायरल व्हिडिओमुळे वन विभागाची कारवाई

गुजरात : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील टल्ली गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात, ३२ वर्षीय शेतकऱ्याने