Birth rate : पनवेलमध्ये घटतोय मुलींचा जन्मदर

नवीन पनवेल (वार्ताहर) : केंद्र शासनाने घटणारा मुलींचा जन्मदर (Birth rate) पाहता गर्भलिंग चाचणी विरोधी कायदा केला आहे. तर प्रत्येक राज्याने देखील त्याची अमलबजावणी केली आहे. तरीदेखील नवी मुंबई आणि रायगडमध्ये मुलींचा जन्मदर घसरला आहे.


‘लापता लडकिया’च्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेअंतर्गत ही बाब समोर आली आहे. शहरी बहुल समजल्या जाणाऱ्या पनवेलमध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी असल्याचे नोंद महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


शासनाने जरी गर्भलिंग चाचणी विरोधी कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, हा एक प्रश्नच आहे. मध्यंतरी केलेल्या सर्व्हेनुसार, राज्यात ६ हजार ९३० सोनेग्रोफी मशिन होत्या. त्यापैकी दीड हजार रायगड आणि नवी मुंबई परिसरात होत्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मशिनच्या संख्या जास्त, त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याचे, ‘लापता लडकिया’ या अहवालातून उघड झाले आहे.


पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्भ निदान कायदा देखरेख समितीच्या अध्यक्ष वर्षा देशपांडे यांनी स्ट्रींग ऑपरेशन करून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना तुरुंगात पाठवले, मात्र नवी मुंबई आणि रायगड परिसरात अशी धाडसत्रे फारशी झालेली नाहीत. काही वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशिनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती अपडेट न ठेवणे आदींमुळे संशयाची सुई असलेल्या दोन वैद्यकीय व्यावसायिकांना पनवेल न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव