रेल्वे मार्गावर धुराचे लोट येताच उडाला गोंधळ, पसरले भीतीचे वातावरण; नेमका कसला होता 'तो' धूर जाणून घ्या

ठाणे : शुक्रवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पसरलेल्या धुरामुळे नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. मध्य रेल्वेवर भीतीचे वातावरणही निर्माण झाले. मोठ्या प्रमाणात पसलेल्या धुरामुळे काही काळ समोरचे दिसेनासे झाले होते, त्यामुळे रेल्वे वाहतूक ही मंद गतीने सुरू होती.



नेमकं घडलं काय?


आज संध्याकाळी मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी अचानक धुराचे लोट पसरले आणि नागरिकांची तारांबळ उडाली. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले कि हा धूर नेमका आहे कसला? तर हा धूर होता एका नाल्यात साचलेल्या कचऱ्याचा.

कायम गजबजाट असलेल्या ठिकाणी म्हणजेच कळवा आणि ठाणे या स्थानकांदरम्यान रुळावरील एका नाल्यातील कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.

प्रवाशांची तारांबळ


संध्याकाळची वेळ असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होती, अश्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रुळावर पसरलेला धूर इतका दाट होता की समोरचे काहीच दिसेनासे झाले, आग लागली आहे का ? किंवा काही अपघात झाला आहे याची कोणतीच कल्पना प्रवाश्यांना नव्हती. त्यामुळे अनेकांनी लोकलमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत.तातडीने आग आटोक्यात आणली त्यामुळे कोणतीही भयंकर घटना टळली. आग भडकली असता प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे आग कश्यामुळे लागली? याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे.

लोकल गाड्या खोळंबल्या


या आगीमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कळव्याकडून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि ठाण्याहून कल्याण- डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुमारे १५ ते २० मिनिटे उशिरा धावल्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला शिवाय मनस्तापही सहन करावा लागला

Comments
Add Comment

Sasaram-Patna Passenger Train Catches Fire : सासाराम-पाटणा पॅसेंजरच्या डब्याला पहाटे भीषण आग, प्लॅटफॉर्मवर उडाली एकच धावपळ!

बिहार : बिहारमधील सासाराम जंक्शन रेल्वे स्थानकावर आज पहाटे एक मोठी दुर्घटना टळली. सासारामहून पाटण्याकडे

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

NEET Paper Leak Case : NEET निकालात ‘१८० पैकी १८०’चा दावा; नांदेडच्या क्लासवर CBIचा छापा

नांदेड : NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असतानाच आता महाराष्ट्रातील नांदेड शहर पुन्हा

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

India-Netherlands : भारत-नेदरलँड्सचा पुढील ५ वर्षांसाठी 'धोरणात्मक भागीदारीचा' रोडमॅप जाहीर

नवी दिल्ली : बदलती जागतिक पुरवठा साखळी आणि भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेदरलँड्स यांनी