Arun Gawli : अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याला मुलाच्या लग्नासाठी चार दिवसांचा सुरक्षेविना पॅरोल मंजूर केला आहे. (Arun Gawli granted parole for four days) अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर केला आहे.


अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलाचे १७ नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करण्यात आला होता. यावर अरुण गवळीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यामध्ये जावे, हा खर्च गवळी यानेच करावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर कोर्टाने गवळीला पॅरोल मंजूर करताना पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्याची परवानगी दिली आहे.


मे २०२० मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. हे लग्न २९ मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीचे लग्न झाले होते.



हे सुद्धा वाचा - मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Comments
Add Comment

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी