Arun Gawli : अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याला मुलाच्या लग्नासाठी चार दिवसांचा सुरक्षेविना पॅरोल मंजूर केला आहे. (Arun Gawli granted parole for four days) अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर केला आहे.


अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलाचे १७ नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करण्यात आला होता. यावर अरुण गवळीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यामध्ये जावे, हा खर्च गवळी यानेच करावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर कोर्टाने गवळीला पॅरोल मंजूर करताना पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्याची परवानगी दिली आहे.


मे २०२० मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. हे लग्न २९ मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीचे लग्न झाले होते.



हे सुद्धा वाचा - मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री