Fox : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने काढले बाहेर

  80

चिपळूण (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील २५ ते ३० फूट खोल पडक्या विहिरीमध्ये कोल्हा (Fox) पडल्याची घटना समोर आली.


वनविभागाच्या पथकाने या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत भुवड (रा. गिम्हवणे, सुजाणनगर) यांनी आपल्या घराच्या जवळ असलेल्या पडक्या विहिरीमध्ये कोल्हा पडल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले.


यानंतर परीक्षेत्र वन अधिकारी दापोली वै.सा. बोराटे, वनपाल सा.स सावंत, खेर्डी वनरक्षक जगताप, सुरेश खानविलकर, किरण करमरकर, ओंकार साळवी वन्यप्राणीमित्र यांनी तत्काळ वन्यप्राणी बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहचत सुमारे २५-३० फूट खोल पडक्या विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्यास काँचपोलच्या साहाय्याने सुरक्षित ताब्यात घेतले.


त्यानंतर पशवैद्यकीय अधिकारी दापोली यांचेकडुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन तो सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून मुक्त करण्यात आले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली आहे.



हे सुद्धा वाचा


Explosion at Lote : लोटेतील डिवाईन कंपनीत स्फोट

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.