दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी; इरफानचे पाकच्या पंतप्रधानांना सडेतोड उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडे लक्ष नाही, असे सडेतोड प्रत्युत्तर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिले आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाची खिल्ली उडवली. त्यांच्या ट्विटला इरफान पठाणने सडेतोड उत्तर दिले आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी टी-२० विश्वचषकातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी दोन सामन्यांतील धावसंख्येचा उल्लेख केला आहे. पहिली धावसंख्या म्हणजे, मागच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध १५२ धावा करत १० विकेट्सने विजय मिळवला होता. दुसरी धावसंख्या म्हणजे, यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध १७० धावा करत १० विकेट्सने सामना जिंकला.


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटला उत्तर देताना इरफान पठाण यांनी लिहिले की, "तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आमच्या सुखात आम्ही सुखी आणि दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सुखी. त्यामुळेच स्वत:चा देश सुधारण्याकडे लक्ष नाही." या ट्विटनंतर शाहबाज शरीफ यांना खूप ट्रोल व्हावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार बाबर आझम यांनाही पत्रकारांनी या मुद्द्यावर प्रश्न विचारला. यावर बाबर म्हणाला की, "आमच्यावर कोणताही दबाव नाही, पण मला या ट्विटबद्दल कोणतीही माहिती नसल्याने मी माफी मागतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की, आम्ही प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू.

Comments
Add Comment

बिहार निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर!

मोदी, शहा, राजनाथ यांच्यासह ४० नेत्यांची यादी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

पटेल मंत्रिमंडळात तीन वर्षांनंतर मोठे फेरबदल; उद्या शहा-नड्डांच्या उपस्थितीत नवीन मंत्र्यांचा

पंतप्रधान मोदींनी आंध्रतील मंदिरात केली पूजा

नांद्याल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नांद्याल जिल्ह्यातील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)