पतंजलीच्या 'या' ५ औषधांवर बंदी!

नवी दिल्ली: योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत.


आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरण उत्तराखंडने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचा हवाला देत पतंजलीच्या दिव्या फार्मसीला दिव्या मधुग्रित, दिव्या आयग्रिट गोल्ड, दिव्या थायरोग्रिट, दिव्या बीपीग्रीट, आणि दिव्या लिपिडोम या पाच औषधांचे उत्पादन थांबवण्यास सांगितले आहे. पतंजलीच्या म्हणण्यानुसार, या औषधांचा वापर मधुमेह, डोळ्यांचा संसर्ग, थायरॉईड, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी केला जात होता.


याबाबत अधिक माहिती अशी की, पतंजली समूहातून तयार करण्यात येत असलेल्या औषधांबाबत केरळचे डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.


“पतंजलिची एक जाहिरात होती, ज्यामध्ये ते म्हणतात की, त्यांचे डोळ्याचे ड्रॉप काचबिंदू, मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या इतर अनेक समस्यांसाठी उपयुक्त आहेत. मात्र यापैकी कोणत्याही समस्येवर उपचार न केल्यास ते अंधत्व आणू शकतात. अशा जाहिराती मानवी जीवनासाठी धोकादायक आहेत,” असे डॉ. बाबू यांचे म्हणणे आहे.


त्यानंतर प्राधिकरणाच्या वतीने औषधांची तपासणी करण्यात आली. या औषधांच्या जाहिरातींवरही आक्षेप घेण्यात आला होता. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचे उत्पादन केले जात होते.


माहिती घेतल्यानंतर प्राधिकरणाने या औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश पतंजली समूहास देण्यात आले. तर, या औषधांचे पुन्हा उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी पुन्हा परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.


दरम्यान, प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. तसेच आयुर्वेदाला विरोध करणाऱ्यांकडून मुद्दाम केली गेल्याचा आरोप रामदेव बाबा आणि पतंजलीच्या वतीने करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे