अतिरेकी गटांमध्ये सामील होण्यामागे हे आहे एक कारण!

शिकागो (वृत्तसंस्था) : दीर्घकाळ एकटेपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीला असुरक्षित वाटू लागते. ही भावना इतकी खोलवर जाते की, माणसाला सुरक्षिततेची चिंता वाटू लागते. शिकागो विद्यापीठातल्या ‘सोशल न्यूरोसायंटिस्ट’ जॉन कॅसिओपो यांनी एकाकीपणाच्या परिणामांवर संशोधन केले. संशोधनात दिसून आले आहे की, एकाकीपणामुळे व्यक्तीचा लवकर मृत्यू होऊ शकतो.


ते म्हणतात की, दीर्घकाळ एकटे राहणे हे कोणत्याही प्रकारचा धोका नसतानाही, मानवी मेंदू शरीराला धोक्याचे संकेत पाठवतो. त्यामुळे शरीर तणाव वाढवणारे हार्मोन्स सोडू लागतो. यामुळे झोप येत नाही आणि रक्तदाबाचा त्रास होतो. डॉ. कॅसिओप्पो यांना त्यांच्या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, दीर्घकाळ एकटं असलेल्या व्यक्तीला इतरांचा सहवास आवडत नाही. त्याला एकटेपणा आवडतो आणि त्याची भीती वाटते.


‘ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित २०२१ चा संशोधन अहवाल सूचित करतो की, लोक पैसे कमावण्याच्या नादात एकमेकांशी इतकी स्पर्धा करत आहेत की, सामाजिक भानही राखू शकत नाहीत.


उच्च पदावर पोहोचलेले लोक आपलं महत्व टिकवण्यासाठी इतकं काम आणि धडपड करत आहेत की, समाजविघातक बनत आहेत. संशोधनात म्हटलं आहे की, नव-उदारमतवाद लोकांमध्ये एक प्रकारचा सामाजिक एकटेपणा, स्पर्धा आणि एकाकीपणाला प्रोत्साहन देत आहे.


तत्वज्ञानी हॅना एरेन्ड्ट यांनी या अवस्थेला ‘अनरूटनेस’ म्हटलं आहे. यामध्ये माणूस समाजापासून दूर जातोच; पण स्वत:च्याच विचारसरणीपासूनही दुरावतो. असे लोक कट्टर बनतात. त्यांना सर्वशक्तिमान देवाबद्दल चांगलं वाटतं. ते कोणत्याही धर्मांध विचारसरणीने सहज प्रेरित होतात.


या वर्षी ‘पॉलिटिकल सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे की, कमी सामाजिक संबंध असलेले लोक कट्टर पक्षांना मतदान करतात. कट्टर विचारसरणीचे समर्थक आणि अतिरेकी गटांमध्ये सामील होण्यामागे एकटेपणा हे एक कारण आहे.

Comments
Add Comment

PM Modi on Nepal Violance: नेपाळमधील जाळपोळीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड अराजकता माजली आहे.  सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेलं Gen

योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

काठमांडू : भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मागील ४-५ वर्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. आधी अफगाणिस्तान,

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे, हिंसक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय

काठमांडू: नेपाळ सरकारने देशात सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा