हेडफोन, इअरफोनमुळे होतो कान आणि हृदयावरही परिणाम

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. काम, गाणी आणि प्रवासात ‘मल्टिमीडिया कंटेंट’ पाहण्यासाठीही हेडफोनचा वापर केला जातो. संगीत ऐकण्यासाठी काही वेळ हेडफोन वापरणे ठीक आहे; पण दीर्घकाळ वापरल्याने आपल्या कानांवर वाईट परिणाम होतो. तसाच तो हृदयावरही होतो, असे डॉक्टर सांगतात.

हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याजवळ आदळतो. त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात. यामुळे बहिरेपणाचाही धोका संभवतो. डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात.

आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ ९० डेसिबल असते, जी हळूहळू ४०-५० डेसिबलपर्यंत कमी होत जाते. हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच; पण हृदयावरही परिणाम करतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचाही धोका वाढतो. ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना इअरफोन्स एकमेकांशी शेअर करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करावा. दिवसभरात ६० मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते, असे डॉक्टर सांगतात.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago