कोई हमसे जीत न पावे!

उपांत्य फेरीत भारतासमोर आज इंग्लंडचे आव्हान


अॅडलेड (वृत्तसंस्था) : दोन्ही आघाड्यांवरील धडाकेबाज कामगिरीने उपांत्य फेरीचे दरवाजे सहज खोलणाऱ्या भारतासमोर अंतिम फेरीत पोहोचण्याआधी इंग्लंडचे आव्हान आहे. उपांत्य फेरीचा हा सामना उद्या गुरुवारी अॅडलेडच्या मैदानात रंगेल. विजेता संघ टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही संघ जीव ओतून मैदानात उतरतील यात शंकाच नाही. भारताने हा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत-पाक ही हायव्होल्टेज लढत चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.


सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ही जोडी भारतासाठी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ताकद आहे. त्यात लोकेश राहुलचा फॉर्म परतला आहे. पंत आणि कार्तिक या यष्टीरक्षकांना फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. कर्णधार रोहित शर्मालाही धावा जमवण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक यांना शेवटच्या दोन सामन्यात तरी फलंदाजीत कमाल करावी लागेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या फलंदाजी किंवा गोलंदाजीत आपली छाप सोडत आहे. त्याचा रोलही संघासाठी कायम महत्त्वाचा राहिला आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास अर्शदीप सिंग, मोहम्मद शमीसह भुवनेश्वर कुमारनेही या स्पर्धेत चमकदार गोलंदाजी केली आहे. अर्शदीपची निर्णायक षटकांतील गोलंदाजी भारतासाठी विजय मिळवून देणारी ठरली आहे. भारताला खरी चिंता आहे ती सलामीची जोडी, फिरकीपटूंची कामगिरी, आणि क्षेत्ररक्षण याची. स्पर्धेत आतापर्यंत अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीला बळी मिळवण्यात आणि धावा रोखण्यात अपयश आलेले आहे. त्यामुळे कदाचित उपांत्य फेरीच्या सामन्यात युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते.


इंग्लंडचा मार्क वुड हा या विश्वचषकातील इंग्लंडचा सर्वात धोकादायक गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ९ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या फिरकीपटूंनीही शानदार गोलंदाजी केली आहे. हे फिरकीपटू टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतात. लियाम लिव्हिंगस्टोनने टीम इंडियाविरुद्ध ५ सामने खेळले आहेत आणि ६ पेक्षा कमी इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत. मोईन अलीने टीम इंडियाविरुद्ध सुमारे १०च्या इकॉनॉमीने धावा दिल्या, परंतु तो देखील संघाला संकटात टाकू शकतो. इंग्लंड संघाची सर्वात मजबूत बाजू म्हणजे त्यांची फलंदाजी. संघाकडे नवव्या क्रमांकापर्यंतचे फलंदाज आहेत.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे