सत्तारांच्या राजीनाम्यासाठी मविआच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

  72

मुंबई : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टीची मागणी केली. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.


आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती शिवसनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितली. यावेळी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राज्यपाल कोश्यारी यांनी निवेदन दिले आहे. हे सरकार बेकायदेशी असल्याचे कायंदे यावेळी म्हणाल्या. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असे चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कायंदे म्हणाल्या. सत्तारांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संतापल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समज देतो म्हणत आहेत, पण सत्तार समज देण्याच्या पलीकडे गेले असल्याचे कायंदे म्हणाल्या.


आत्तापर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मात्र, घेतला नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून तरी मला अपेक्षा असल्याचे कायंदे म्हणाल्या. तसेच धमकवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही कायंदे यांनी केली. यावेळी अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधातही निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री जर महिलांचा अपमान करणार असतील तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. शिंदे सरकारडे थोडी जर नैतिकता असेल तर पुढच्या २४ तासात अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांचे राजीनामे घ्यावेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केलं. चुकीची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिला गप्प बसणार नाही. राज्यातील महिला ही सावित्रीची लेक असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या.

Comments
Add Comment

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच