सत्तारांच्या राजीनाम्यासाठी मविआच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Share

मुंबई : महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टीची मागणी केली. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती शिवसनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी सांगितली. यावेळी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं राज्यपाल कोश्यारी यांनी निवेदन दिले आहे. हे सरकार बेकायदेशी असल्याचे कायंदे यावेळी म्हणाल्या. आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असे चुकीचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे कायंदे म्हणाल्या. सत्तारांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला संतापल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समज देतो म्हणत आहेत, पण सत्तार समज देण्याच्या पलीकडे गेले असल्याचे कायंदे म्हणाल्या.

आत्तापर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता. मात्र, घेतला नाही. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून तरी मला अपेक्षा असल्याचे कायंदे म्हणाल्या. तसेच धमकवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही कायंदे यांनी केली. यावेळी अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधातही निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री जर महिलांचा अपमान करणार असतील तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. शिंदे सरकारडे थोडी जर नैतिकता असेल तर पुढच्या २४ तासात अब्दुल सत्तारांसह मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री गुलाबराव पाटील यांचे राजीनामे घ्यावेत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केलं. चुकीची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्रातील महिला गप्प बसणार नाही. राज्यातील महिला ही सावित्रीची लेक असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाल्या.

Recent Posts

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

22 minutes ago

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

1 hour ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

7 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

8 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

8 hours ago