सावधान! जादा झोप आरोग्यासाठी हानिकारक? होतात 'हे' गंभीर आजार!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना झोपेची आवड असते आणि बहुतेक वेळा फायदे लक्षात घेऊन अतिरिक्त वेळ झोपायलाही आवडते. कधी कधी हे करणे चांगले असते. कारण स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपलीच असते; परंतु अतिरिक्त तास झोपणे ही तुमची सवय आणि गरज बनते, तेव्हा समस्या उद्भवू शकते. कारण जितकी कमी झोप घेणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, तितकंच जास्त झोपल्यानेही शरीरावर वाईट परिणाम होतो.


१८ ते ५८ वर्षे वयोगटातल्यांनी सात-आठ तास झोपणे आवश्यक मानले जाते; परंतु यापेक्षा कमी वयोगटातल्यांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी झोपेचे तास ९ ते ११ पर्यंत असू शकतात; पण एखादी तरुण व्यक्ती रोज नऊ ते ११ तास झोपू लागते, तेव्हा ती चिंतेची बाब बनते. याचा अर्थ शरीरात आरोग्याबाबत काही समस्या असू शकतात. अशा वेळी शरीरात पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येत असेल किंवा ‘हायपरसोम्निया’ची समस्या असू शकते. ‘हायपरसोम्निया’मध्ये एखाद्या व्यक्तीला सतत झोप येते. ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती इच्छा असूनही जागृत राहू शकत नाही. त्याला सतत झोप येत राहते आणि इतकी झोप येते की सतत मादक वाटू लागते. ‘हायपरसोम्निया’ मध्ये, २४ पैकी दहा तास झोपल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला झोप येत राहते. म्हणजेच दहा तास झोपूनही झोप पूर्ण होत नाही असे वाटते. या समस्येने ग्रस्त व्यक्ती दिवसातल्या २४ तासांपैकी १६ तास झोपू शकते. ही स्थिती काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत टिकू शकते. त्यामुळे, जास्त झोप येत असल्याचे स्पष्ट होताच ताबडतोब डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे, असे सांगितले जाते.


‘हायपरसोम्निया’वर उपचार करण्यासाठी सामान्यतः वापरली जाणारी औषधे, रोगाच्या मूळ कारणावर कार्य करण्याऐवजी, सहसा इतर समस्या निर्माण करतात. कारण ही औषधे खूप उत्तेजक मानली जातात. ही औषधे रोग पूर्णपणे बरा करण्यासाठी वापरली गेल्यास ‘नार्कोलेप्सी’चे कारण बनतात. हा एक प्रकारचा झोपेशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या मेंदूचे झोपेच्या चक्रावरील नियंत्रण सुटते. अशा परिस्थितीत चांगल्या डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. झोपण्यासाठी बेड स्वच्छ आणि खोलीचे वातावरण अनुकूल ठेवावे. चहा-कॉफीचे सेवन कमी करावे. अशा वेळी मद्यपानापासून दूर राहणंही महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदिक औषधे त्रुटींवर नैसर्गिकरित्या मात करतात आणि त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी