अंधेरी पोटनिवडणूकीत ३९१ ज्येष्ठ नागरिकांचे घरून मतदान

  42

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक झाली. यात एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी ३१.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ४३० ज्येष्ठ नागरिकांनी घरूनच मतदानाला सहमती दर्शवली होती. यापैकी ९१ टक्के म्हणजे ३९१ ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान केले आहे.


भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने शारीरिक आजाराने पिडीत व ८० किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्कर मतदारांसाठी 'घरून मतदान'चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची यादी ७ हजारांपर्यंत होती. निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ४३० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरूनच मतदान करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी ३९२ मतदारांनी (९१ टक्के) घरूनच मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.


दरम्यान ३९२ मतदारांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत 'घरून मतदान' करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात