अंधेरी पोटनिवडणूकीत ३९१ ज्येष्ठ नागरिकांचे घरून मतदान

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघात गुरुवारी पोटनिवडणूक झाली. यात एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी ३१.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर ४३० ज्येष्ठ नागरिकांनी घरूनच मतदानाला सहमती दर्शवली होती. यापैकी ९१ टक्के म्हणजे ३९१ ज्येष्ठ नागरिकांनी घरून मतदान केले आहे.


भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने शारीरिक आजाराने पिडीत व ८० किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्कर मतदारांसाठी 'घरून मतदान'चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची यादी ७ हजारांपर्यंत होती. निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ४३० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरूनच मतदान करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी ३९२ मतदारांनी (९१ टक्के) घरूनच मतपत्रिकेद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.


दरम्यान ३९२ मतदारांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत 'घरून मतदान' करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी

कृषी समृद्धी योजनेस राज्य सरकारची मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : "कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय