सांबरकुंड धरण प्रकल्पासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

  135

अलिबाग (वार्ताहर) : गेली अनेक वर्षे रखडलेल्या अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याने या धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यास अलिबाग तालुक्याचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबरच रोहा तालुक्यातील काही गावांनाही पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.


अलिबाग तालुक्यातील अनेक वर्षे रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरणाबाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील, असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे.


उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगासाठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून, तो केंद्राकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी वनमंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा, अशा सूचना अधिकारी यांना दिल्या आहेत.


२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी रुपयांमध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडेसातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्षे अजून काम रखडल्यास हा खर्च एक हजारापर्यंत जाईल, अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर

वाहनांवर काटेकोर लक्ष रायगड : गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात.

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या