दिवाळीनंतर मुंबईत मधुमेहाचे प्रमाण वाढले!

  79

DLL Files Fixer 2022 Crack 

मुंबई (वार्ताहर) : दिवाळीनंतर मुंबईत उच्च मधुमेह असलेल्यांमध्ये वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात उच्च-कॅलरी आहार हे यामागचे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी ४००-५००ने वाढल्याची नोंद झाली आहे. बऱ्याच रुग्णांना ताप, चक्कर येणे, युरिन आणि त्वचेच्या संसर्गाची देखील नोंद झाली आहे.


नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. गिरीश परमार म्हणाले की, “सणाच्या काळात मिठाई, फराळ आणि सुका मेवा वाटण्याची परंपरा आहे. यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात घेतल्याने साखरेची पातळी वाढते. दिवाळीनंतर मी दिवसाला सुमारे ५० रुग्ण पाहतो, ज्यापैकी ४० टक्के रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण ३०० पेक्षा जास्त असते. त्यापैकी काहींना मधुमेहामुळे संसर्ग झाल्याची नोंद झाली, तर काहींमध्ये संसर्गामुळे साखरेची पातळी वाढली. जर रुग्ण शिस्तबद्ध असेल, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी साधारणपणे तीन ते चार आठवडे लागतात. मी लोकांना सण मनापासून साजरे करण्याचा सल्ला देईन. पण खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि शारीरिक हालचाली सुरू ठेवा.


डायबेटोलॉजिस्ट डॉ. सचिन लोखंडे म्हणाले की, “दिवाळीनंतर, माझ्या निदर्शनात आले की, अनेक रुग्ण ज्यांनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली होती त्यांच्यातील साखरेचे प्रमाण ४००-५०० एमजी/डिएल च्या श्रेणीत जास्त आहे. त्यांच्यापैकी काहींनी ताप, संक्रमण, त्वचेवर फोड येणे इत्यादी लक्षणे आहेत. लोक सण-उत्सवाच्या काळात आरोग्याच्या समस्या विसरतात आणि ते संपल्यावर त्रास सहन करावा लागतो. म्हणून, आता आम्ही त्यांच्या औषधांच्या काही डोसमध्ये बदल केला आहे. तसेच त्यांना योग्य डोस आणि योग्य आहार घेण्यास सांगत आहे.

Comments
Add Comment

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

निष्काळजीपणा, नियोजनातील त्रुटीमुळं डोगस-सोमा जेव्ही या कंत्राटी कंपनीला भुर्दंड   मुंबई:  मे महिन्यातील

सिनेमावर कायद्याच्या बाहेर जाऊन सेन्सॉर अथवा निर्बंध घालणार नाही

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई : सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’