आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १५ वातानुकूलित फेऱ्या रद्द!

  155

Nero Burning ROM

मुंबई (वार्ताहर) : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पश्चिम रेल्वेच्या १५ वातानुकूलित फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पश्चिम रेल्वेच्या एका वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या फेऱ्या रद्द केल्याचे समजते.


वातानुकूलित लोकलच्या तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेने काही महिन्यांपूर्वी ८ नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या वाढवली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ४८वर पोहचली होती. तरीही वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी कमी झालेली नव्हती. सकाळी आणि संध्याकाळी एसी लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने नव्या वेळापत्रकात अतिरिक्त ३१ लोकल फेऱ्या वाढविण्याची घोषणा केली आहे.


त्यामुळे पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलची संख्या ७९वर पोहचली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशाची गैरसोय होत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील एका वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे दिवसभरातील १५ वातानुकूलित लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेला रद्द कराव्या लागल्या.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)