पेणचा स्वरूप अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम

पेण (वार्ताहर) : पेण येथील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.


कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून ३ ते ४ तास अभ्यास करून त्याने हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके यांनी सांगितले. आपल्या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रोफेसर दीपिका शेट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया स्वरूप शेळके याने दिली.


कॉलेजने मला संशोधनाकरिता पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीम वर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व कॉलेजच्या शिक्षकांचा आभारी आहे. भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने व्यक्त केला.


कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे २ वर्षांपासून सोडविता आले नव्हते. या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली. त्यामुळे स्वरूपची अभ्यासाची रिव्हिजन तर झालीच व या ९ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता आले, अशी माहिती स्वरूपची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालीका स्मिता शेळके यांनी दिली.


लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग (बाटू) या कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके या विद्यार्थ्यांने पदविका परीक्षेत ९९.७०टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची प्रतिष्ठा अधिक प्रकाशमान केली आहे, अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.मधुकर दाभाडे यांनी दिली.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे

मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे

भूषण पतंगे मृत्युप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांची मागणी अलिबाग  : बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगेच्या मृत्यूने

पोहोच रस्त्याच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना न्याय द्या

अलिबाग  : शहापूर येथील एमआयडीसी पोहोच रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शहापूर

दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत.