पेणचा स्वरूप अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम

पेण (वार्ताहर) : पेण येथील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ९९.७० टक्के गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.


कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून ३ ते ४ तास अभ्यास करून त्याने हे यश मिळविल्याचे स्वरूप शेळके यांनी सांगितले. आपल्या यशात कॉलेजचे प्रिन्सिपल मधुकर दाभाडे, डॉ. नितीन लिंगायत, प्रोफेसर दीपिका शेट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया स्वरूप शेळके याने दिली.


कॉलेजने मला संशोधनाकरिता पीएलसी लॅब उपलब्ध करून दिल्यानेच पीएलसी सिस्टीम वर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी कॉलेजचा व कॉलेजच्या शिक्षकांचा आभारी आहे. भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच यूपीएससी परीक्षा देऊन देशाच्या प्रशासनात हातभार लावून देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके याने व्यक्त केला.


कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांना काही विषय मागील सुमारे २ वर्षांपासून सोडविता आले नव्हते. या विद्यार्थ्यांना स्वरूपने अभ्यासक्रम स्वतःच्या पद्धतीने शिकविला व अभ्यास करण्याची टेक्निकही शिकवली. त्यामुळे स्वरूपची अभ्यासाची रिव्हिजन तर झालीच व या ९ विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त करता आले, अशी माहिती स्वरूपची आई व नॅशनल कॉम्प्युटरच्या संचालीका स्मिता शेळके यांनी दिली.


लोणेरे येथील इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग (बाटू) या कॉलेज मधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग पदविकेचे शिक्षण घेणाऱ्या स्वरूप शेळके या विद्यार्थ्यांने पदविका परीक्षेत ९९.७०टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावुन कॉलेजच्या नावाची प्रतिष्ठा अधिक प्रकाशमान केली आहे, अशी प्रतिक्रिया बाटू कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.मधुकर दाभाडे यांनी दिली.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग