शिवसागर (वृत्तसंस्था) : भारत-पाक सामना म्हटला तर क्रिकेट चाहतेही टीव्हीसमोरून हलत नाहीत. मात्र या सामन्यातील दबावामुळे काही वाईट घटनाही समोर येतात. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना पाहताना एका ३४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
कधीही न विसरता येणारा क्रिकेट सामना रविवारी मेलबर्नमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने ९० हजार प्रेक्षकांसमोर पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने टी-२० विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ दाखवला. दरम्यान या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना पाहताना एका ३४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सामना पाहत असताना तो व्यक्ती अचानक बेशुद्ध झाला आणि खाली पडला. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बिटू गोगोई असे मृताचे नाव आहे. दरम्यान, जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता.
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…
जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…