Categories: क्रीडा

विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Share

मेलबर्न (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झालेल्या लढतीत पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावल्यानंतर या सामन्यातील हिरो विराट कोहलीवर अभिनंदन, कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर कोहलीच्या कौतुकाचा महापूर आला आहे. जगभरातील आजी-माजी क्रिकेट खेळाडू, विविध क्षेत्रातील दिग्गजांसह चाहत्यांनी कोहलीच्या या अविस्मरणीय खेळीचे अभिनंदन केले आहे.

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पाकिस्तानविरोधातील रोमांचक विजयानंतर सोशल मीडियात १६ तासांत कोट्यवधी पोस्ट टाकण्यात आल्या. प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करू इच्छित होता. क्रीडापटू असो, कलाकार असो किंवा चाहता सर्वांनी आपल्या भावना पोस्टमधून व्यक्त केल्या. राजकीय नेतेही यात मागे नव्हते. कोहलीच्या या खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पोस्ट करत लिहिले आहे की, ‘विराट कोहली, निःसंशयपणे ही तुझ्या जीवनातील सर्वोत्तम खेळी आहे. तुला खेळताना पाहणे हा एक सुखद अनुभव होता. १९व्या षटकात रौफच्या चेंडूवर बॅकफूटवरून मारलेला षटकार दर्शनीय होता.

आयपीएलमधील विराट कोहलीचा सहकारी खेळाडू आणि मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जाणारा एबी डिव्हिलिअर्सने लिहिले की, ‘विराट, माझ्या मित्रा, ते स्पेशल आणि इन्क्रेडिबल होते. बेस्ट ऑफ द बेस्ट’. सामन्यानंतर आयसीसीने किंग इज बॅक म्हणत कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रिलॅक्स पडोसी इटस् ओन्ली अ मॅच’ असे म्हणत विरेंद्र सेहवागने कोहलीला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ‘आजचा सामना नर्व्हस करणारा होता. आधी हा ९५ टक्के आमच्या बाजूने होता. पण विराट कोहलीने वर्ल्ड क्लास मॅच विनिंग खेळी केली. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या.

‘मेलबर्न मैदानावर रविवारी भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील आपल्या पहिल्या सामन्यात खेळत होते. महामुकाबल्याच्या सुरुवातीला भारतीय वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र, मधल्या फळीने पाकिस्तानची सामन्यात वापसी करत १५९ धावा केल्या. टीम इंडियाची सुरुवात पाहून असे वाटत होते की हा लो-स्कोअरिंग मॅच असेल. अशात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मेलबर्नच्या बाऊन्सर पिचवर शाहीन, नसीम आणि रौफच्या जोरदार गोलंदाजीला भारतीय फलंदाजीकडे कोणतेही उत्तर नव्हते. यामुळेच पॉवर प्लेमध्ये ३१ धावांवर ४ फलंदाज बाद असा धावफलक बघायला मिळाला. नंतर मात्र विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या सहाय्याने संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

3 minutes ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

33 minutes ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

60 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

1 hour ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

2 hours ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

2 hours ago