मुंबई : कोविडच्या प्रादुर्भावानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी आपण साजरी करीत आहोत. गोरगरिबांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप राज्यभर केले आहे. या उपक्रमातून सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी, अशा सदिच्छा मोफत किट वाटप कार्यक्रमात माजी आमदार व ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील यांनी दिल्या.
क्वारी रोड येथे रविवारी सायंकाळी आनंदाचा शिधा किटचे मोफत वाटप करण्यात आले. या किटमध्ये १ किलो मैदा, १ किलो साखर, १ किलो रवा, १ लिटर पामतेलाचा समावेश आहे. ५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा किटचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी ईशान्य मुंबई महिला विधानसभा संघटक राजश्री मांदिवलीकर, भांडुप विधानसभा संघटक नेहा पाटकर, उपविभाग प्रमुख प्रकाश माने, उपविभाग प्रमुख संजय दुडे, शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, संजय शिंदे, अमित डिचोलकर तसेच महिला शाखा प्रमुख तेजस्वी बने, समन्वयक ज्योती तांडेल व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…