मुंबई : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांमुळे मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या सर्वच महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे आणि शनिवार रविवार सुट्टी यामुळे मुंबई बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोरघाट आणि खालापूर टोलजवळ एक ते दीड किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. बोरघाटात अमृतांजन पूलाजवळ वाहनांची रांग पाहायला मिळत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…