मुंबई (वार्ताहर) : मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिल्या पत्नीने पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांना संपत्तीची वाटणीमध्ये हिस्सा मिळू नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका निकाली काढत मुंबई उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे, की पतीचे पहिल्या लग्नातील पत्नी असताना दुसरे विवाह करणे हे अवैद्य आहे. परंतु, दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यालाही वडिलांच्या संपत्तीत वारसदार म्हणून हक्क मिळाला हवा असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने याचिकाकरतेची याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबई नावाजलेल्या कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपत्तीची वाटणी करताना पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीच्या अपत्यांना त्यात वाटा मिळू नये यासाठी कोर्टात दाद मागितली होती. यावर दुसऱ्या पत्नीच्या मुलीनेही कोर्टात आपले म्हणणे मांडले. आपल्याला वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्काने अधिकार मिळावा असे त्यात म्हटले होते.
१९५५च्या हिंदू विवाह कायद्यानुसार दुसरे लग्न अवैध ठरवले जाते. असे असले तरी दुसऱ्या पत्नीला झालेल्या अपत्याला वडिलांच्या वारसा हक्कावर अधिकार मिळायला हवा असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने मृत व्यक्तीच्या संपत्तीचे समान भाग करून त्याचा एक हिस्सा हा दुसऱ्या पत्नीच्या मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्या कंपनीला निर्देशही जारी करण्यात आले आहेत.
येत्या चार महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी असे कोर्टाने म्हटले आहे. मृत व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला त्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा देण्यात यावा असे कोर्टाने यावेळी म्हटले आहे. त्यानुसार संपत्तीची विभागणी केली जावी असेही म्हटले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना कंपनीकडून जी भरपाई मिळणार आहे, ती देताना त्यानुसार विभागणी केली जावी असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…