Categories: देश

मध्यप्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघातात १४ ठार; ४० जण जखमी

Share

भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात मध्यरात्री बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दिवाळीसाठी घराकडे निघालेल्या १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ४० हून जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशला जोडणाऱ्या नॅशनल हायवे ३० वर हा भीषण अपघात झाला आहे. अपघात झालेली बस हैदराबादहून गोरखपूरला जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास रिवाजवळ हा अपघात झाला आहे. बसमधील सर्व प्रवासी कामगार होते. दिवाळी साजरी करण्यासाठी ते आपल्या घरी जात होते. घटनास्थळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ज्यात उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांचा समावेश होता. ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या दुर्घटनेबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मध्यप्रदेशच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘अपघातमध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. मी सर्व जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन करतो’. हा अपघात नेमका कसा आणि कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाहीये. तसेच गाडीत नेमके किती प्रवासी होते, ते कुठले निवासी होते त्यांची नावे या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

2 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

3 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

4 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

5 hours ago