नव्या नेतृत्वानंतरच व्यापार करार पुढे जाईल : गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-यूके मुक्त व्यापार करार योग्य दिशेने जात आहे. यूकेमध्ये पुढे काय होते ते पाहावे लागेल. नेतृत्वात झटपट बदल होईल की संपूर्ण प्रक्रिया पुढे जाईल. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि या पदावर कोण येईल हे पाहावे लागेल त्यानंतरच आम्ही मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पाऊल टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी २०ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला आहे. भारत-यूके मुक्त व्यापार करार त्यांच्या ४५ दिवसांच्या कार्यकाळात करता आलेला नाही. यावर भारताचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली. हा करार मार्गावर असून ब्रिटनमध्ये होत असलेल्या राजकीय बदल संपण्याच्या प्रतिक्षेत आहे, असे ते म्हणाले.


ट्रसने दिवाळीपर्यंत भारतासोबत मुक्त व्यापार करार करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी या करारात जीवन विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्याचा प्रयत्न करेन. भारतासोबतचे संरक्षण आणि व्यापार संबंध अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे