नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-यूके मुक्त व्यापार करार योग्य दिशेने जात आहे. यूकेमध्ये पुढे काय होते ते पाहावे लागेल. नेतृत्वात झटपट बदल होईल की संपूर्ण प्रक्रिया पुढे जाईल. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि या पदावर कोण येईल हे पाहावे लागेल त्यानंतरच आम्ही मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पाऊल टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांनी २०ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला आहे. भारत-यूके मुक्त व्यापार करार त्यांच्या ४५ दिवसांच्या कार्यकाळात करता आलेला नाही. यावर भारताचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली. हा करार मार्गावर असून ब्रिटनमध्ये होत असलेल्या राजकीय बदल संपण्याच्या प्रतिक्षेत आहे, असे ते म्हणाले.
ट्रसने दिवाळीपर्यंत भारतासोबत मुक्त व्यापार करार करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी या करारात जीवन विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्याचा प्रयत्न करेन. भारतासोबतचे संरक्षण आणि व्यापार संबंध अधिक दृढ करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…