स्पाईसजेट ३० ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने चालणार; निर्बंध हटवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअरलाइन्स कंपनी स्पाईसजेट आता ३० ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमान चालवणार आहे. कंपनीवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. यापूर्वी, स्पाइसजेट विमानाशी संबंधित अनेक घटना समोर आल्यानंतर विमान वाहतूक नियामकाने एअरलाइनकडून स्पष्टीकरण मागवले होते. १८ दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या ८ घटनांनंतर डीजीसीएने स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.


२७ जुलै रोजी, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी स्पाईसजेटची अनेक विमाने उड्डाणात क्रॅश झाल्यानंतर पुढील आठवड्यांसाठी केवळ ५० टक्के फ्लाइट चालवण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. या आठ आठवड्यांची मुदत संपण्याआधीच, डीजीसीएने गेल्या महिन्यात नवीन आदेश जारी करून ही बंदी २९ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.


दरम्यान, स्पाइसजेटने मंगळवारी आपल्या कर्मचाऱ्यांमधील ८० वैमानिकांना तीन महिन्यांच्या पगाराशिवाय रजेवर पाठवले होते. विमान कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला होता. विमान कंपनीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली होती.

Comments
Add Comment

डॉक्टरांनी लाच घेऊन मुलांच्या जीवाशी खेळ केला, पोलिसांचा कोल्ड्रिफ प्रकरणात गंभीर आरोप

छिंदवाडा : खोकल्यावरचे औषध म्हणून कोल्ड्रिफ कफ सिरप प्यायलेल्या मध्य प्रदेशमधील अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला.

IND vs WI : वेस्ट इंडिजचा सुपडा साफ! टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने दणदणीत विजय, सलग १०वी कसोटी मालिका खिशात!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवून

ला निनामुळे नोव्हेंबरपासून तीव्र थंडीचा अंदाज

राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड

कोल्ड्रिफ कफ सिरप कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारकडून रद्द

तामिळनाडू सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करत,

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित