स्पाईसजेट ३० ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने चालणार; निर्बंध हटवले

  29

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअरलाइन्स कंपनी स्पाईसजेट आता ३० ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमान चालवणार आहे. कंपनीवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. यापूर्वी, स्पाइसजेट विमानाशी संबंधित अनेक घटना समोर आल्यानंतर विमान वाहतूक नियामकाने एअरलाइनकडून स्पष्टीकरण मागवले होते. १८ दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या ८ घटनांनंतर डीजीसीएने स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.


२७ जुलै रोजी, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी स्पाईसजेटची अनेक विमाने उड्डाणात क्रॅश झाल्यानंतर पुढील आठवड्यांसाठी केवळ ५० टक्के फ्लाइट चालवण्याचे आदेश दिले. तेव्हापासून विमान कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. या आठ आठवड्यांची मुदत संपण्याआधीच, डीजीसीएने गेल्या महिन्यात नवीन आदेश जारी करून ही बंदी २९ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती.


दरम्यान, स्पाइसजेटने मंगळवारी आपल्या कर्मचाऱ्यांमधील ८० वैमानिकांना तीन महिन्यांच्या पगाराशिवाय रजेवर पाठवले होते. विमान कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला होता. विमान कंपनीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली होती.

Comments
Add Comment

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश

फवाद खान, माहिरा आणि शाहीद आफ्रिदी...पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या अकाऊंट्सवर २४ तासांत पुन्हा बंदी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी