अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची दोन तासांत सुटका

Share

विरार (प्रतिनिधी) : पालघर येथील एका पाच वर्षाच्या मुलीचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफिने सदर मुलीची अवघ्या दोन तासात सुटका केली. दरम्यान आरोपीला गजाआड करण्यात आले असून पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

१९ ऑक्टोबर रोजी पालघर हिला कमला पार्क माहीम रोड येथील वर्धमान सोसायटीत राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच आरोपीकडून मुलीच्या वडिलांकडे एक लाख रुपयांच्या पैशांची मागणी करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या आदेशान्वये निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी वेगवेगळी पथके तयार करून अपहरित मुलीचा शोध सुरू केला.

दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी याचा मोबाईल क्र. उपलब्ध करून सायबर सेल पालघर यांच्या मार्फत त्याचे लोकेशन काढले. यावेळी त्याचे लोकेशन उसर्णीम केळवा परिसरात दिसून आल्याने आरोपीला केळवा रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेऊन अपहरित मुलीची सुटका करण्यात आली. तर आरोपी हा मुलीच्या शेजारील इमारतीत राहणारा असल्याचे समोर आले. यावेळी त्याने चॉकलेटच्या बहाण्याने सदर मुलीचे अपहरण केले हेाते. मात्र पोलिसांच्या कामगिरीमुळे अवघ्या दोन तासामध्ये आरोपी गजाआड झाला.

Recent Posts

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…

6 minutes ago

Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…

53 minutes ago

कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…

2 hours ago

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी होणार बंद !

पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…

2 hours ago

पहलगाममध्ये हल्ल्यासाठी गुहेतून आले अतिरेकी, सूत्रांची माहिती

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…

3 hours ago

भारताने दिला पहिला दणका, लष्कर – ए – तोयबाच्या कमांडर अल्ताफ लल्लीचा खात्मा

बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…

4 hours ago