नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेस पक्षाला तब्बल २४ वर्षांनंतर नवा अध्यक्ष मिळाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. खरगे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली. तर शशी थरूर यांना केवळ १ हजार ७२ मते मिळवता आली. ४१६ मते नाकारण्यात आली.
मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते की आता माझी भूमिकाही खरगेजीच ठरवतील.
पत्रकार परिषदेत राहुल यांनी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेतल्याबद्दल काँग्रेसचा अभिमान व्यक्त केला आहे. येथे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी दावा केला की, खरगे यांना ९५०० मतांपैकी ७८९७ मते मिळाली. त्याचवेळी थरूर यांना केवळ १०७२ मते मिळवता आली.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…