दापोली नगर पंचायतीने स्वीकारले गुरांचे पालकत्व

  108

दापोली (प्रतिनिधी) : दापोली नगरपंचायतीच्या वतीने बालोद्यानात कोंडलेल्या गुरांच्या खाण्या-पाण्याची व्यवस्था केली आहे. दापोली नगरपंचायतीने शहरातील नियोजित बालोद्यानात मोकाट जनावरांना कोंडून ठेवल्याने यातील एका बैलाचा मृत्यू झाला होता. या जनावरांना खाण्या-पाण्याची व्यवस्था नसल्याने नगर पंचायतीच्या वतीने या गुरांच्या खाण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. याबद्दल दापोलीतील नागरिकांनी आभार मानले आहेत.


शहरात गेल्या आठवड्यात जनावरांना बेशुद्ध करून गुरे पळवणाऱ्या टोळीचा जागरुक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातील जनावरे पोलिसांनी नगरपंचायतीच्या ताब्यात दिल्यावर ही सर्व जनावरे स्टेट बँकेसमोर नियोजित बालोद्यानात ठेवली होती. मात्र या जनावरांना खाणे व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने त्यातील एका बैलाचा मृत्यू ओढवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नगर पंचायतीने या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यासाठी प्लास्टीकचे मोठे बकेट येथे ठेवण्यात आले. मात्र या जनावरांच्या खाण्याची जी व्यवस्था केली, ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे.


यातील एका बैलाचा दुदैवी मृत्यू ओढावला होता यासंदर्भात नगर पंचायतीचे आरोग्य विभागाचे संदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा बैल कोणत्या कारणाने दगावला, याबाबत अद्याप तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यावर हा बैल कोणत्या कारणाने मृत पावला ते स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

कोकणात मुसळधार, राजापूर-चिपळूणमध्ये हाहाकार!

मंदिर - घरांमध्ये पाणी शिरले तर रस्ते व पुलांची दुर्दशा रत्नागिरी : जिल्हयात सक्रिय झालेल्या मान्सूनने चांगलाच

रत्नागिरी : तब्बल ३७ वर्षांनी आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुराचे पाणी!

रत्नागिरी : राजापुर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाचा कहर झाला आहे. श्रीक्षेत्र आडिवरे येथील श्री महाकाली

शॉक लागल्यामुळे १३ वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली येथे शॉक लागून १३ वर्षांच्या स्वरांगी गिजमचा तडफडून मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण

आगामी स्थािनक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा

आमदार निलेश राणे यांचे आवाहन चिपळूण : कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण यांच वेगळं नातं आहे, ते कधीच तुटू शकत नाही.