दापोली नगर पंचायतीने स्वीकारले गुरांचे पालकत्व

Share

दापोली (प्रतिनिधी) : दापोली नगरपंचायतीच्या वतीने बालोद्यानात कोंडलेल्या गुरांच्या खाण्या-पाण्याची व्यवस्था केली आहे. दापोली नगरपंचायतीने शहरातील नियोजित बालोद्यानात मोकाट जनावरांना कोंडून ठेवल्याने यातील एका बैलाचा मृत्यू झाला होता. या जनावरांना खाण्या-पाण्याची व्यवस्था नसल्याने नगर पंचायतीच्या वतीने या गुरांच्या खाण्याची व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली. याबद्दल दापोलीतील नागरिकांनी आभार मानले आहेत.

शहरात गेल्या आठवड्यात जनावरांना बेशुद्ध करून गुरे पळवणाऱ्या टोळीचा जागरुक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यातील जनावरे पोलिसांनी नगरपंचायतीच्या ताब्यात दिल्यावर ही सर्व जनावरे स्टेट बँकेसमोर नियोजित बालोद्यानात ठेवली होती. मात्र या जनावरांना खाणे व पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात न आल्याने त्यातील एका बैलाचा मृत्यू ओढवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नगर पंचायतीने या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. यासाठी प्लास्टीकचे मोठे बकेट येथे ठेवण्यात आले. मात्र या जनावरांच्या खाण्याची जी व्यवस्था केली, ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे.

यातील एका बैलाचा दुदैवी मृत्यू ओढावला होता यासंदर्भात नगर पंचायतीचे आरोग्य विभागाचे संदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा बैल कोणत्या कारणाने दगावला, याबाबत अद्याप तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यावर हा बैल कोणत्या कारणाने मृत पावला ते स्पष्ट होणार आहे.

Recent Posts

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

25 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

49 minutes ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

54 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

1 hour ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

2 hours ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

3 hours ago