कर्तृत्वाच्या जोरावर एमसीएची निवडणूक लढवतोय : अमोल काळे

Share

मुंबई (वार्ताहर) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आपण कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे,’ माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.’ असे वक्तव्य शरद पवार-आशिष शेलार पॅनलचे उमेदवार अमोल काळे यांनी केले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक उद्या गुरुवारी पार पडणार आहे. यावेळी शरद पवार – आशिष शेलार पॅनलकडून अमोल काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील असणार असून या निवडणूकीपूर्वी काळे यांनी आपण ही निवडणूक कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे,’ माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.’ असे वक्तव्य केले.

अमोल काळे यांना राजकीय संबंधामुळे ही संधी मिळाल्याची टीका झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमोल काळे म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मित्रा आहे, म्हणून माझ्यासंदर्भात असे बोलले जाते. पण मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर एमसीए निवडणूक लढवत आहे. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त आहे हे आरोप चुकीचे आहेत. तसेच माझा एमसीएशी काही संबंध नाही असे म्हणणे चूकीचे आहे, मी जवळपास ७ वर्षे एमसीएमध्ये काम करतोय. मला मुंबई क्रिकेटसाठी भरपूर काही करायचे आहे, यासाठीच मी निवडणूक लढतोय. पवार-शेलार एकत्र फक्त माझ्यासाठी आलेले नाहीत. या आधीही पवार-शेलार किंवा राजकीय नेते राजकारणापलीकडे एकत्र आले आहेत. हे काही नवीन नाही, असे अमोल काळे म्हणाले.

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

2 minutes ago

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…

14 minutes ago

भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…

17 minutes ago

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…

17 minutes ago

Diabetes Care : उन्हाळ्यात मधुमेहींनी आहाराची अशी काळजी घ्या….

उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…

25 minutes ago

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

36 minutes ago