ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतरच्या यंदा येणारी दिवाळी उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल आहे. असे असताना महागाई, शिवकाशी येथे चिघळलेला संप आणि पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे यंदा फटाके ३० ते ५० टक्के महाग झाले आहेत. त्यामुळे धुमधडाक्यातली दिवाळी यंदा बजेटच्या बाहेर जाणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दिवाळी जवळ आल्यावर कोपरीतील फटाक्याच्या दुकानात मोठीच गर्दी पहायला मिळते. पण यंदा अजून तसा माहोल काही पहायला मिळत नाही. त्यामुळे व्यापारी चिंतेत असताना दिवाळी फटाक्यांच्या किमतीही यंदा वाढणार असल्याने ग्राहक कोणत्या फटाक्यांना पसंती देतात, हे पहावे लागणार आहे. याबाबत मराठा फटाक्याचे विक्रेते आहुजा यांनी सांगितले की, शिवकाशी येथून फटाके येतात. पण यंदा तिथे तीन महिने संप चिघळल्याने त्याचा मोठाच फटका फटाका बाजारावर येत आहे. पाहिजे त्या प्रमाणात फटाक्यांची आवक होत नाही.
साधारणत: सप्टेंबर महिन्यात पावसाला परतीचे वेध लागतात. पण यंदा ऑक्टोबर अर्धा महिला संपला तरी पाऊस परतायचे नाव घेत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन फटका व्यावसायिकांना बसत आहे. गेल्या काही वर्षात इंधनाचे दरही वाढलेले आहेत. त्यानेही फटाके महाग होत चालले आहेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना अनेक राज्यात बंदी आहे. पण ज्या राज्यात त्याची समज नाही तेथून हे फटाके येत असतात त्यानेही फटाके महाग होत चालले आहे. एकूणात यंदा फटाके ३० ते ५० टक्के महाग झाले आहेत.
ठाण्यातील कोपरी भागात लक्ष्मी फायर वर्क्स, महाराष्ट्र फायर वर्क्स सारखी मोठी होलसेल फटाके विक्री करणारी दुकाने नवनवीन फॅन्सी आयटम घेऊन आले आहेत. ग्राहकांना प्रदूषणविरहीत आणि इकोफ्रेंडली फटाकेही खरेदी करता येणार आहे. शिवाय मल्टीशॉर्ट कलर फटाक्यांचाही ट्रेण्ड यंदा पाहण्यात येत आहे. हवेत उडून प्रकाश फेकणारे फटाके यंदा आकर्षणाचा बिंदू आहे. छोट्या फटाक्यांच्या माळांनाही चांगली मागणी आहे. फुलबाजे, बंदुका, टिकल्या यांचा ट्रेण्ड संपलेला नाही. धूर सोडणा-या सापगोळ्या पालक टाळतात, पण हे सगळे फटाके यंदा भलतेच महागले आहेत, त्यामुळे गोरगरीबांना यंदा हे फटाके वाजवणे दिवास्वप्नच ठरणार आहे.
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…