केडीएमसी महापालिकेत 'दिवाळी गिफ्टला' मनाई!

कल्याण (प्रतिनिधी) : दिवाळी तोंडावर आली की पालिकेतील अधिकारी, त्यांच्या हाताखालील कर्मचारी यांना शहरातील बड्या व्यक्ती, संस्थांकडून दिवाळी गिफ्ट देऊन खूश केले जाते. आपली कामे लवकर व्हावी यासाठी गिफ्ट देऊन खूष ठेवले जाते. दिवाळी तर हक्काने या वस्तू उघड उघड दिल्या जातात. परंतू आता या दिवाळी गिफ्ट ला केडीएमसी पालिकेत मनाई करण्यात आली आहे.


अधिकारी, कर्मचारी यांनी कोणाकडूनही दिवाळी गिफ्ट स्वतः घेऊ नये. तसेच इतर व्यक्तींमार्फत हे गिफ्ट येत असेल तरी ते घेण्यात येऊ नये. असेही नको आणि तसेही गिफ्ट नको अन्यथा शिस्तभंगाची कारवाई संबंधितांवर केली जाईल असा फतवा केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काढला आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.


कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचारी, अधिकाऱी यांनी पालिकेत स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींच्या माध्यमांमधून दिवाळी भेटीचा स्वीकार करू नये, असे पत्रक आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी मंगळवारी काढले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचा निर्णय प्रशासनाने घेतली आहे.


कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार लोकाभिमुख, प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कामात पारदर्शकपणा, सातत्य कायम ठेवण्यासाठी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तींकडून दिवाळी भेट वस्तू स्वीकारू नये.


अशाप्रकारची भेट वस्तू कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः किंवा आपले कुटुंबीय, खासगी व्यक्तींमार्फत स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७१ मधील कलम १२ नुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधिता विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये