‘सुट्टी घेऊन मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकी मतदानादरम्यान, नोकरदारांना विशेष सुट्टी जाहीर करण्यात येते. मात्र बहुतांश लोक सुट्टी घेऊन पिकनिकचा प्लान करतात. अशा मतदान न करणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा प्लॅन आखला आहे. याची सुरुवात गुजरात विधानसभा निवडणुकीपासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


निवडणूक आयोगाने १ हजारांहून अधिक कार्पोरेट कंपन्यांसोबत एक करार केला आहे. त्यानुसार या खासगी कंपन्या मतदानाची सुट्टी घेणाऱ्या आणि मतदान न करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी खासगी कंपन्या नोडल अधिकारी नियुक्त करणार आहे. हा अधिकारी मतदान न करणाऱ्या नोकरदारांवर लक्ष ठेवणार आहे. एवढेच नव्हे, तर मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव कंपनीच्या वेबसाइटवर झळकणार आहे. तसेच नोटीस बोर्डावरही अशा कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे.


गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही २३३ एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी या कंपन्या आमची मदत करणार आहेत. गुजरातमध्ये पहिल्यांदा १,०१७ कॉर्पोरेट कंपन्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे, असे पी. भारती यांनी सांगितले आहे.


आयोगाकडून गुजरामध्ये १०० हून अधिक कामगारांना रोजगार देणाऱ्या उद्योगांवर लक्ष देण्यात येणार आहे. या उद्योगांना त्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. मतदान न करणाऱ्या कामगारांची हे अधिकारी यादी तयार करतील. अशाच प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील मतदान न करणाऱ्या कामगारांवरही नजर ठेवली जाणार आहे. या वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

Comments
Add Comment

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी

प्लास्टिकवर प्रक्रिया करून तरुण बनला करोडपती

कचऱ्याचे रूपांतरण संपत्तीत दिल्ली : दिल्लीतील एका तरुणाने प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक नवीन

भारताला खुणावतेय रशियन बाजारपेठ

२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातले

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार