अंधेरी पोटनिवडणुकीचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेणार!

  83

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक लढवावी की बिनविरोध करावी, यावरून भाजपमध्ये एकमत होत नसल्याने आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत निर्णय घेतील, अशी चर्चा आता सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपमध्ये आता दोन भिन्न मतप्रवाह असल्याचे आता समोर येत आहे. निवडणूक लढवण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आग्रही आहेत. तर, या निवडणुकीत पराभव झाल्यास आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसेल व मुंबई पालिकेतील भाजपची पतच जाईल, असे स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीबाबत विचार करावा, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे आहे.


यामुळे या पोटनिवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेणार आहे. तसेच, केंद्रीय नेतृत्व या निवडणुकीतून माघार घेण्यास सांगेल, अशी शक्यताही फार कमी असल्याचे सांगितले जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बिनविरोध निवडणुकीकडे कल असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे केंद्राकडून डावलले जाण्याची शक्यता आहे.


आज अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होत आहे. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे शिंदे गटही बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय चर्चा करतात व काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांना कोणत्याही स्थितीत मुंबईत सत्ता हवी आहे. त्यामुळे मुंबईत ताकद वाढवण्यासाठी भाजप सर्व शक्ती पणाला लावत आहेत. अशात अंधेरी पोटनिवडणूक म्हणजे आशिष शेलारांसाठी संधी आहे. ही निवडणूक जिंकल्यास ते मोदी-शहांच्या गुड बुकमध्ये जातील. त्यामुळे भविष्यात त्यांना मोठ्या पदावरही संधी मिळू शकते. ही मोठी संधी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही असू शकते. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीची सर्व जबाबदारी आशिष शेलार यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. पोटनिवडणुकीसाठी ते अंधेरीतच तळ ठोकून आहेत.


आशिष शेलारांनी अंधेरी पोटनिवडणूक जिंकून दिल्यास पक्षात त्यांचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही असू शकतात, अशी शक्यताही राजकीय जाणकारांनी केली आहे.


अंधेरी पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार मुरजी पटेल हे गुजराती आहेत. त्यामुळे आता पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यास गुजराती मतदार नाराज होऊ शकतात. तसेच, आशिष शेलार हे अमित शहांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या निवडणुकीतून मुरजी पटेल माघार घेतील, अशी शक्यता फार कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

निष्काळजीपणा, नियोजनातील त्रुटीमुळं डोगस-सोमा जेव्ही या कंत्राटी कंपनीला भुर्दंड   मुंबई:  मे महिन्यातील

सिनेमावर कायद्याच्या बाहेर जाऊन सेन्सॉर अथवा निर्बंध घालणार नाही

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई : सिनेमा सेन्सॉर करण्यासाठी कायद्याने एक सेन्सॉर बोर्ड तयार

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’