गिरगावचा स्वामी समर्थ मठ

Share

श्री स्वामी समर्थांचा हरिभाऊंवर कसा परिणाम झाला? त्यांना एवढे वैराग्य का आले? त्या मागचा महाराजांचा हेतू काय होता? आदी प्रश्नांचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न करू या. श्री स्वामींनी हरिभाऊ तावड्यांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल घडवून आणले. त्यांची मनोभूमिका विरक्ती-अनासक्तीकडे वळविली. त्यासाठी त्यांनी वापरलेल्या क्लृप्त्या या अगोदरच्या हरिभाऊंशी संबंधित लीलांमध्ये आलेल्या आहेत. श्री स्वामींनी अभिमंत्रित केलेल्या पादुका हरिभाऊंच्या मस्तकावर ठेवल्या. चमत्कार घडावा त्याप्रमाणे हरिभाऊंमध्ये अवधूतत्त्व पूर्ण वैराग्य रोमारोमांत भिनले. आता अरिभाऊ श्री स्वामींचे सूत झाले होते.

मुंबईस आल्या आल्या त्यांनी सद्गुरू आदेशानुसार स्वतःचा संसार खरोखर लुटविला. त्याच्या पत्नीच्या अंगावरील साठ तोळे सोन्याचे तोडे, चोवीस तोळ्यांच्या बांगड्या, उठरा पुतळ्याचे गाठले, ठुशी आदी दागिने हरिभाऊंनी मित्राकरवी विकले. अालेली सर्व रक्कम ब्रह्मणांस वाटून दिली. त्यांची पत्नी ताराबाईने संसार, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटविले जात असताना आकांत मांडला. रडून – रडून त्यांचे डोळे सुजले. थोडे तरी दागिने राहू द्यावे ही पत्नी ताराबाईची विनवणीही मानली नाही. पत्नीच्या गळ्यात मणिमंगळसूत्रही राहू दिले नाही. पत्नीस नेसावयास एक पांढरे पातळ व स्वतःसाठी अंगावरील भगवी वस्त्रेच काय ती त्यांनी ठेवली. बाकी सर्व संसार, संसारातील किडूक-मिडूक आदी वाटून ते पूर्ण विरक्त झाले. त्यांच्या वैराग्याची ही परम सीमा होती. नोकरीतला रस तर श्री स्वामींच्या प्रथम दर्शन भेटीतच निघून गेला होता. आता त्यातूनही ते पूर्ण मुक्त झाले होते.

स्वामीसुतांत एवढे वैराग्य निर्माण केले याचे कारण स्वामीसुतांनी दर्याकिनारी किल्ला बांधून, जनसेवेचा ध्वज अधिकाधिक उंच न्यावा हा लोकाभिमुख उद्देश श्री स्वामींचा होता. तेव्हा अनेकांना अक्कलकोटापेक्षा मुंबई जाण्या-येण्याच्या दृष्टीने अधिक सोयीचीृ जवळची आणि स्वस्त होती. ते अनेकांना मार्गदर्शनासाठी स्वामीसुतांकडे पाठवत. स्वामीसुतांनी गिरगांवच्या मठात स्वामी पादुकांची फोटोची स्थापना केली. सर्व गिरगांवकरांचे कल्याणच केले.

श्री स्वामी समर्थांसारखा सद्गुरू आपल्या शिष्यांसाठी काय करू शकतो? हे सर्व का करतो? हे सहजच लक्षात येते? यासाठी स्वामीसुतांसारखी निरिच्छ-निखळ हृदयाच्या तळापासून आणि बेंबीच्या देठापासून भक्ती करावी लागते. तरच स्वामी प्रसन्न होतात, तर म्हणा मंत्र ‘स्वामी समर्थ’.

Recent Posts

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

33 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

59 minutes ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

2 hours ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

8 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

8 hours ago