बंगळुरू : हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर केएसआरटीसी बस आणि दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हा अपघात हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधी नगर गावाजवळ सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना शनिवारी रात्री उशिरा झाला. शिमोगा- अरसेकरे येथील राष्ट्रीय महामार्ग 69 वर हा भीषण अपघात झाला आहे.
टीटी वाहन आणि केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. लीलावती (५०), चैत्र (३३), समर्थ (१०), डिम्पी (१२), तन्मय (१०), ध्रुव (२), वंदना (२०), दोड्डाय्या (६०), भारती (५०) अशी मृतांची नावे आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाच्या मंजुनाथाचे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. ते सर्व जण झोपेत असताना हा अपघात झाला.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…