साईबाबा यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : प्राध्यापक साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने केलेली निर्दोष सुटका सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे प्राध्यापक साईबाबा यांना मोठा झटका बसला आहे.


देशाविरोधात युद्ध पुकारने, माओवाद्यांशी संबंध, माओवादी कारवायात सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली साईबाबा यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी आणि एका पत्रकारासह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी त्यांची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.


आज, शनिवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीवेळी समाजाच्या हितासाठी आम्ही खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या ७ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या साईबाबा यांची सुटका होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा