नवी दिल्ली : प्राध्यापक साईबाबा यांची नागपूर खंडपीठाने केलेली निर्दोष सुटका सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे प्राध्यापक साईबाबा यांना मोठा झटका बसला आहे.
देशाविरोधात युद्ध पुकारने, माओवाद्यांशी संबंध, माओवादी कारवायात सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली साईबाबा यांना २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी आणि एका पत्रकारासह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी त्यांची निर्दोष सुटका केली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आज, शनिवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष बेंचसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीवेळी समाजाच्या हितासाठी आम्ही खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देत आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या ७ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या साईबाबा यांची सुटका होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…